Followers

Thursday, April 9, 2026

आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत… ❓

 आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली घरी बसून आहेत. आता देखील जर आई-वडील जागे झाले नाहीत, तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते… ❗🤔


आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत… ❓

समाजात आज 27-28-32 वयापर्यंत अनेक मुली अविवाहित , कारण त्यांच्या अपेक्षा कधी-कधी त्यांच्आहेतया परिस्थितीपेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.

यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे. 😔

सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन.

पैसा आवश्यक आहेच 💰, पण तो मर्यादेपर्यंतच.

फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे.

पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी. 🏡❤️

अधिक पैशाच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही.

“संपत्ती विकत घेता येते, पण गुण नाही.”

माझ्या मते घर-परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का हे पहावे;

“जास्त” या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये.

सुखी वैवाहिक जीवन जगा. 🌸

30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होतात. 🩺

आज याहूनही वाईट परिस्थिती कुंडली जुळवणीमुळे निर्माण झाली आहे.

ज्यांच्याशी कुंडली जुळते पण घर-परिवार किंवा मुलगा चांगला नाही,

आणि जिथे मुलामध्ये सर्व गुण आहेत तिथे कुंडली जुळत नाही—

अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त कुंडलीमुळे नातं तोडतो. 🤷‍♀️

36 पैकी 20 गुण किंवा 36/36 गुण जुळूनही अनेकांचे संसार दुःखी आहेत,

कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाहीत.


कुंडलीच्या नावाखाली आधुनिक, सुशिक्षित समाजाला एक शतक मागे नेले आहे.

या चक्रात कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत. 😞

आज मुलींसाठी नातं शोधताना

मुलामध्ये जणू २४ कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं,

आणि बघता-बघता चार-पाच वर्षे निघून जातात. ⏳

उच्च “शिक्षण” किंवा “जॉब” या नावाखालीही वेळ घालवला जातो.


मुलगा पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचं उदाहरण बनली आहे…

स्वतःचं घर आहे का❓

असल्यास फर्निचर कसं आहे❓

घरात खोल्या किती❓

गाडी आहे का❓ कोणती❓ 🚗

राहणीमान, खाणंपिणं कसं❓

भाऊ-बहिणी किती❓

आई-वडील कुणाकडे आहेत❓

बहिणींची लग्नं झाली आहेत का❓

आई-वडिलांचा स्वभाव कसा आहे❓

नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत का❓

मुलाची उंची किती❓

रंगरूप कसं❓

शिक्षण, उत्पन्न, बँक बॅलन्स किती❓ 💼💳

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे का❓

मित्र किती आहेत❓


आई-वडिलांना शहाणपण येतं तेव्हा मुलीचं वय 30 पार झालेलं असतं.

मग पुढची चार-पाच वर्षांची धावपळ मुलांच्या तरुणपणाचा बळी घेते. 😢

एक काळ असा होता की घराणं पाहून नाती ठरत.

ती नाती टिकायची.

विहीन- विहिणीमध्ये मध्ये आदर, प्रेम, जिव्हाळा असायचा. ❤️ धन कमी असलं तरी आनंद घरात भरलेला असायचा.

कधी मतभेद झाले तरी वडीलधारी माणसं ते मिटवायची.


घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता.

दांपत्य जीवन गोड-तिखट अनुभवांतून सरत जायचं.

दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे,

आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे. 🌱

आज ते संस्कार कुठे आहेत❓

लाज-शरम इतिहासजमा झाली आहे.

नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते.

आज मुलं-मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत,

आणि म्हणतात— “आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही.”

मुलं-मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करताना

तेव्हा कुणाला कुंडली आठवत नाही.

आई-वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात.

तेव्हा पैसा, स्टेटस, इनकम काहीच अडथळा ठरत नाही. 🤷‍♂️


आता देखील आई-वडील जागे झाले नाहीत

तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. ⚠️

मुलींची लग्नं 22-23-24 वयात

आणि मुलांची 25-26 वयात झाली पाहिजेत.

सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात.

घर, गाडी, बंगला याआधी

वर्तन आणि स्वभाव तोलून पाहा.

आई-वडीलही आर्थिक झगमगाटात वाहून गेले आहेत.

पैशांच्या शर्यतीत नाती-गोती फार मागे पडली आहेत.

घरं तुटत आहेत,

प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. 💔

या पिढीने कुटुंबसंस्थेचं असं तमाशा केलं आहे

की येणाऱ्या पिढ्या “संस्कार”

फक्त पुस्तकांत वाचतील. 📚

समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे,

नाहीतर नाती शोधतच राहू…


आपली यावर काय प्रतिक्रिया आहे❓

आपले अमूल्य विचार कमेंटमध्ये नक्की मांडावेत.

No comments:

Post a Comment